![]() |
Valavalkar Couple. |
बापू हे धर्मानुरागी होते. ताप करून जी गुरुकृपा मिळत नाही ती त्यांना लाभली. श्री. बलावाधुत बालमुकुंद महाराजांचा त्यांच्यावर अनुग्रह झाला. त्याक्षणीच बापूनी आपले सर्वस्व गुरुचरणी अर्पण केले. कोल्हापुरात व्यापार व उद्योगात घट्ट पाय रोवल्यानंतर बापूनी समाजसेवेचे व्रत स्वीकारले. बापूनी आपले सारे जीवन व वित्त समाजासाठी अर्पण केले. आज कोल्हापुरातील अनेक संस्थांचे ते संस्थापक, हितचिंतक आणि आश्रयदाते म्हणून कार्यरत आहेत.एवढेच न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांनी शैक्षणिक, सामाजिक संस्था, विद्यालये, दवाखाने उभारले आहेत. या दाम्पत्यांनी व त्यांच्या ट्रस्टीनि आजवर शिक्षण , आरोग्य, धर्मसमाजसेवा इ. क्षेत्रातील कल्याणकारी कार्यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांचे बृहतदान केले आहे. दातृत्वाचा हा ओघ आजपर्यंत अखंडपणे वाहतो आहे. त्यांच्या दातृत्वाला मानवतेची झालर आहे. देव दगडात नाही तर माणसात असतो या भावनेपोटी बापूनी शैक्षणिक संस्था आणि अनाथालय यांच्या कडेच आपला दातृत्वाचा ओघ वळवला आहे.
अशा या थोर दानशूर व शिक्षणप्रेमी दाम्पत्याचा आमच्या शिक्षण तपस्विनी मा. माईसाहेब यांनी स्थापन केलेल्या "श्रीपंत अमात्य बालविकास विश्वस्त निधी" या संस्थेच्या वाडीला व विकासाला आधार 'वड' लाभला आहे.
Author
Anita D. Vardhe
[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ]