Sunday, April 1, 2012

वालावलकर दांपत्य


मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आल्यानंतर स्वतःच्या घामाची भाकर मिळवायची या ध्यासाने मा. शा. कृ. पंत वालावलकर उर्फ बापू यांनी मुंबईची वाट धरली. मुंबईतील मेनन डक्ले या प्रख्यात बांधकामाचे ठेके घेणाऱ्या कंपनीत ३० रुपयांवर मुकादम म्हणून काम सुरु केले. पण लगेचच पावसाळा सुरु झाला. बांधकाम थांबले व बापूंची नोकरीही संपुष्टात आली. त्यानंतर व्यापार करावयाचा असा निर्णय घेतला. बापूंच्या खिशात फक्त १५ रुपयेच शिल्लक होते. त्यातूनच तराजू व वजने घेतली. भाजी विकायचा धंदा सुरु केला. प्रामाणिकपणा, कष्ट व चिकाटी हे संस्कार. व्यापार नसला तरी पोट भरायचे.
Valavalkar Couple.
वयाच्या २४ व्या वर्षी बापूंचा शुभविवाह सामंत - नेवाळकर परिवारातील नलिनीताईशी झाला. घरातील लोकांच्या आग्रहास्तव बापू लग्नानंतर परत आपल्या मायभूमीत आले. व्यापारात आत्मविश्वास दुणावला व ते कुडाळसारख्या छोट्या व्यापार पेठेतून कोल्हापूर सारख्या मोठ्या व्यापारपेठेत आले. कोल्हापूरमध्ये व्यापार करत असताना सौ. नलिनीताईपण त्यांच्या बरोबरीने राबल्या. प्रत्येक कर्तुत्ववान पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो ; हे वाक्य बापूंच्या बाबतीत खरे असल्याचे दिसून येते. कापस धंद्यात मंदीची लाट आली तरी या दापात्याने धैर्याने तोंड दिले.
बापू हे धर्मानुरागी होते. ताप करून जी गुरुकृपा मिळत नाही ती त्यांना लाभली. श्री. बलावाधुत बालमुकुंद महाराजांचा त्यांच्यावर अनुग्रह झाला. त्याक्षणीच बापूनी आपले सर्वस्व गुरुचरणी अर्पण केले. कोल्हापुरात व्यापार व उद्योगात घट्ट पाय रोवल्यानंतर बापूनी समाजसेवेचे व्रत स्वीकारले. बापूनी आपले सारे जीवन व वित्त समाजासाठी अर्पण केले. आज कोल्हापुरातील अनेक संस्थांचे ते संस्थापक, हितचिंतक आणि आश्रयदाते म्हणून कार्यरत आहेत.एवढेच न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांनी शैक्षणिक, सामाजिक संस्था, विद्यालये, दवाखाने उभारले आहेत. या दाम्पत्यांनी व त्यांच्या ट्रस्टीनि आजवर शिक्षण , आरोग्य, धर्मसमाजसेवा इ. क्षेत्रातील कल्याणकारी कार्यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांचे बृहतदान केले आहे. दातृत्वाचा हा ओघ आजपर्यंत अखंडपणे वाहतो आहे. त्यांच्या दातृत्वाला मानवतेची झालर आहे. देव दगडात नाही तर माणसात असतो या भावनेपोटी बापूनी शैक्षणिक संस्था आणि अनाथालय यांच्या कडेच आपला दातृत्वाचा ओघ वळवला आहे.
अशा या थोर दानशूर व शिक्षणप्रेमी दाम्पत्याचा आमच्या शिक्षण तपस्विनी मा. माईसाहेब यांनी स्थापन केलेल्या "श्रीपंत अमात्य बालविकास विश्वस्त निधी" या संस्थेच्या वाडीला व विकासाला आधार 'वड' लाभला आहे.



Author
Anita D. Vardhe 

[ Original Article from "सुवर्ण पंख" . Read Note for more information ]