मागे वळून पाहताना
[ भाग १०: वेगळेपण ]
[ भाग १०: वेगळेपण ]
हा एवडा व्याप म्हणजे पैशाचा प्रश्न आहे. आमच्या शाळेची फी
जरा जास्त आहे. पण या फीशिवाय दुसरा पैशाचा असा मार्ग नाही. अनुदान मी घेत
नाही, आणि ते घ्यायचं नाही असं पहिल्यापासून मी ठरवलं आहे. त्यामुळे
येणाऱ्या फीतून भागवावे लागते. फी जास्त असल्याची पालकांना कल्पना आहे,
शिक्षकांनाहि आहे.
शिक्षकांना ज्यावेळी मी नोकरीला घेते त्यावेळी पूर्ण
कल्पना देते. शिक्षकांना जास्तीत जास्त पगार कसा देता येईल ते मी पाहते.
हे काबुल असेल तरच शाळेत या असे सांगते. मात्र जो मी पगार सांगेन तेवढा
पगार मी देते. त्यात कमी जास्त होणार नाही. त्यामुळे दोन वह्यांचा हिशोब मी
कधी ठेवत नाही. आणि जवळ जवळ पंचवीस-तीस वर्षे शिक्षक माझ्याकडे आहेत.
घरातले
संस्कार आणि शाळेतले संस्कार यात फरक पडतो आहे. मात्र टी.व्ही. वरील कोणते
कार्यक्रम आपल्या मुलांनी बघावेत, कोणते बघू नयेत यात पालकांनीच लक्ष
घालायला नको का ? या दृष्टिन पालक जागरूक पाहिजेत.
मी संस्था सुरु केली.
ती व्यवस्थित चालवली. मला सहकारी चांगले मिळाले. संस्था रजिस्टर झाली आहे.
त्याचा ट्रस्ट आहे. सुदैवाने मला विश्वासही चांगले मिळाले आहेत. त्यामुळ
संस्था वाढतच जाईल. याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही.
मी खूप बोलले.
ऐंशी वर्षाच्या प्रवासानंतर थोड मग वळून पाहताना मला समाधान वाटत. या
संस्थेची पन्नास वर्षे हेच माझ आयुष्य समजते. कारण बाल मंदिरच नाव खेडोपाडी
झाल आहे. सुदैवाने बालशिक्षणाच्या बाबतीत सरकार आता जागृत झाल आहे. या
विभागात सरकारांन कधी लक्षच घटल नव्हत, बाल शिक्षण हा शिक्षणाचा एक भाग आहे
हे त्यांनी कधीच मानलेल नव्हत. परंतु सुदैवानं हा शिक्षणाचा महत्वाचा भाग
आहे हे शासनाच्या लक्षात अल आहे. त्या दृष्टिन त्यांनी प्रयत्न सुरु केलेत.
विनानुदानित संस्था म्हणून शासनाकडून थोडाफार त्रास होतो. दहावीला
परवानगी मिळविण्याच्या बाबतीत आम्हाला खूप अडचणी आल्या. पण त्यातून आम्ही
अनेकांच्या मदतीन पार पडलो. आणि खर सांगायचं तर पालकाच आमच्या मागे
खंबीरपणाने उभे होते. हा महत्वाचा भाग आहे.
वास्तविक खर पाहायचं तर
हायस्कूल काढायचा माझा बेत नव्हता. पहिली ते चौथी आणि बालमंदिर एवढाच माझ
कार्यक्षेत्र होत. खर तर बाल्मान्दिरच. परंतु पालकांच्या आग्रहातून माझ्या
अनिच्चेतून हयास्कुलाची भरणी झाली. संस्थेची इमारत तीही माझ्या
कल्पनेप्रमाणे उभी राहिली. याच सर श्रेय मी पालकांना देते. आणि सर्वात मोठ
श्रेय शांताराम पंत वालावलकर यांना आहे.
या इमारतीविषयी ती पाहून मला
अनेकजण विचारतात. इतर शाळेसारखी आपली ठोकळेबाज इमारत नसावी असं मला वाटत
होत. आपली हि शाळेची इमारत वेगळी व्हावी म्हणून ज्यावेळी मला प्लान दाखविले
तेव्हा त्या अर्कितेक्ट्ना मी म्हंटल, काही तरी वेगळ करा. या शाळेची इमारत
इतर शाळेपेक्षा वेगळी आहे असं लोकांना वाटेल. मध्यभागी आपण उभे राहिलो तर
सर्व वर्गावर लक्ष देता येत. हेच या इमारतीच वैशिष्ट आहे.
[ Read : Special Note for this article. ]






0 comments:
Post a Comment